वृत्तसंस्था/ कोलकाता
येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात दिल्ली विरूद्ध मंगळवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर यजमान बंगालची स्थिती मजबूत झाली आहे. या सामन्यात बंगालने पहिल्या डावात 318 धावा जमविल्यानंतर दिल्लीने पहिल्या डावात 6 बाद 192 धावा जमविल्या आहेत.
रणजी स्पर्धेच्या अ गटातील या सामन्यात बंगालने 5 बाद 286 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. बंगाल संघातील मुझूमदार 99 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर बंगालचा डाव गडगडला. त्यांचे शेवटचे पाच गडी 12 षटकांत बाद झाले. बंगालचा पहिला डाव 98.4 षटकांत 318 धावांवर आटोपला. मुझूमदारने 99, गोस्वामीने 59 तर शहबाज अहमदने 46 आणि कौशिक घोषने 46 धावा केल्या. दिल्लीतर्फे सिमरजीत सिंगने 4 तर विकास मिश्राने 3 गडी बाद केले.
दिल्लीच्या पहिल्या डावाला सावध सुरूवात झाली पण खेळाच्या शेवटच्या सत्रात दिल्लीचे 4 गडी बाद झाल्याने बंगालची स्थिती मजबूत झाली आहे. बंगालच्या शाहबाज अहमदने सलग दोन चेंडूवर दिल्लीचे दोन फलंदाज बाद केले. दिल्लीतर्फे ध्रृव शोरेने 65 तर दलालने 40 धावा जमविल्या. बंगालतर्फे शाहबाज अहमद आणि दास यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
बंगाल प. डाव-98.4 षटकांत सर्वबाद 318 (मुझूमदार 99, गोस्वामी 59, शाहबाज अहमद 46, घोष 46, सिमरजीत सिंग 4-77, विकास मिश्रा 3-78),
दिल्ली प. डाव- 65.3 षटकांत 10 बाद 192 (शोरे 65, दलाल 40, शाहबज अहमद आणि दास प्रत्येकी 2 बळी).