शेतकऱयांची फसवणूकरताळी उत्पादक शेतकऱयांचा आरोप
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
शेतकऱयांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळावा, वजन आणि दरामध्ये त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने बाजार समित्यांची स्थापना केली आहे. मात्र बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या या मुख्य उद्देशालाच हरताळ फासण्यात येत असल्याचा आरोप रताळी उत्पादक शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. कारण कोरोनाचा बाऊ करून रताळी व्यापारी पिकाचा लिलाव न करता मनमानी करून दर ठरवत आहेत. यामध्ये शेतकरी बांधवांची फसवणूक होत असल्याचा आरोप रताळी उत्पादक शेतकऱयांकडून करण्यात येत आहे.
रताळी उत्पादक शेतकऱयांचे मोठे नुकसान
बेळगाव परिसरामध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाने सर्व व्यापारी बांधवांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. सुरक्षित अंतर ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आदेशाची अंमलबजावणी करूनच व्यापार करावा असे आवाहन केले. मात्र, रताळी व्यापाऱयांनी कोरोनाचा बाऊ करून गर्दी होत असल्याचे सांगत सप्टेंबर महिन्यापासून रताळी सिझनाला सुरुवात केली. तेव्हापासून रताळी पिकाचा सवाल न करताच मनमानी करून दर ठरवत आहेत. त्यामुळे शेतकऱयांचे नुकसान होत असल्याचा आरोप रताळी उत्पादक शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे.
कांदा व्यापारी बांधवांकडून सवाल
बेळगाव एपीएमसीमध्ये कांदा, बटाटा आवक मोठय़ा प्रमाणात होत असते. कांदा व्यापारी बटाटय़ांचा लिलाव करूनच व्यापार करण्यात येतो. लिलाव केल्यामुळे चढाओढीमध्ये शेतकरी बांधवांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असते. मात्र लिलाव न करताच व्यापार केल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत व्यापारीवर्गाकडे मागणी केली असता त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱयांतून करण्यात येत आहे.
रताळी पिकाचे वान करून उतरवण्याची मागणी
बाजार समितीमध्ये गुळ, कांदा, बटाटा, कडधान्ये भाजीपाला शेतकरी बांधव बाजारात विक्रीसाठी आणत असतात. त्यावेळी त्या मालाचे वजन शेतकरी बांधवांसमोर करून दुकानात माल उतरवला जातो. मात्र रताळी पिकाचे वजनमाप न करताच तो उतरविला जातो. तो विक्री झाल्यानंतर त्याचे वजनमाप केले जाते. यातसुद्धा शेतकरीवर्गाचे नुकसान होत असते. त्यामुळे व्यापारी बांधवांनी रताळी पिकाचे वजन करूनच पोती उतरवून घ्यावीत, अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे. तरी बाजार समिती प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन रताळी पिकाचे वजन करून लिलावाद्वारे विक्री करण्यासाठी व्यापारीवर्गाला भाग पाडावे, अशी मागणी शेतकरी उत्पादकांतून करण्यात येत आहे.
बुधवारी एका दुकानामध्ये लिलाव
बुधवारी एका दुकानामध्ये शेतकऱयांच्या वारंवार केलेल्या मागणीनुसार त्या दुकान मालकाने रताळी पिकाचा सवाल केला. त्याचा दर 1350 रु. असा झाला. लिलावावेळी चढाओढीत चांगला दर मिळाल्याने शेतकरी उत्पादकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. मागील शनिवारी रताळी पिकाचा भाव 1100 रुपये झाला. त्याच पिकाला लिलावामुळे 1350 रु. असा भाव मिळाला.
रताळी उत्पादकांना वाली कोण?
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकऱयांसाठी अश्वासनांची खैरात करून निवडून आलेले अकरा शेतकरी प्रतिनिधी बाजार समितीमध्ये कार्यरत असतानासुद्धा शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत लिलाव करून विक्री करणे, शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत रताळी पिकाचे वजनमाप करणे या मागण्यांकडे शेतकरी प्रतिनिधींनी दुर्लक्ष करण्याचे कारण काय? असा संतप्त सवाल रताळी उत्पादक शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.