प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याखाली असलेल्या समुद्राच्या खडकात 22 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल़ा या युवतीने किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केली की हा घातपात आहे याबाबत उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहेत़ दरम्यान या युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यादृष्टीने शहर पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े
युवतीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड सहकाऱयांसह आले. तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली आह़े तसेच आजूबाजूच्या दगडाला देखील रक्त लागलेले आहे. त्यामुळे या युवतीचा किल्ल्यावरून खाली पडल्याने दुखापत होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आह़े
दरम्यान या युवतीने स्वतःहून उडी मारली, तिचा तोल जाऊन ती पडल़ी अथवा तिला कोणी धक्का मारून खाली ढकलेले याबाबत शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत़ ही युवती ज्या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आली त्याठिकाणी केवळ तिची ओढणी मिळून आली आहे. मात्र तिची ओळख पटण्यासाठी कोणतेही कागदपत्र मिळालेले नाह़ीत तसेच स्थानिकांना देखील मुलीच्या मृतदेहाची ओळख करता आलेली नाह़ी त्यामुळे ही मुलगी बाहेरील परिसरातून याठिकाणी आली होती असा अंदाज आह़े
शहर पोलिसांकडून सोमवारी सायंकाळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आह़े तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठवला आह़े दरम्यान नातेवाईकांची माहिती मिळाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आह़े या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आह़े तरी सर्व शक्यतांचा विचार करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.