प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर ज्या किल्ल्याच्या पायथ्याला छत्रपती शाहू महाराजांनी वसवले आहे तो किल्ला अजिंक्यतारा.याच किल्ल्यावर रविवारी धर्मरक्षक राजधानी सातारा या संस्थेच्या मावळ्यांनी संवर्धनाची मोहीम राबवून रत्नशाळेची स्वच्छता केली.दिवसभर या मावळ्यांनी संवर्धन करून सायंकाळी गड उतरून आले.
बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे किल्ले अजिंक्यतायाच्या संवर्धनासाठी काम करणाया अनेक संस्था पैकी धर्मरक्षक राजधानी सातारा ही एक.रविवारी या संस्थेने दुर्ग अजिंक्यतारा संवर्धन मोहिम राबवली.या मोहिमेत गडावरील रत्नशाळेचे अवशेष जे मातीच्या खाली बुजलेले होते व त्यावर काटेरी झुडपे उगवली होती ते सर्व साफ करून अवशेष संवर्धीत करण्यात आले. तिथेच रत्नशाळेच्या विखुरलेल्या पाय्रयाचे दगड पुन्हा एकत्र करून पाय्रया रचून घेतल्या. तसेच गडावरील धान्य कोठारांचे चौथरेही दगड माती खाली गेले होते त्यांना सुद्धा मोकळा श्वास देण्यात आला.लवकरच एक मोठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे व नियोजनबद्ध शास्त्राsक्त पद्धतीने संवर्धन करण्यात येत आहे.पुढेही अविरत चालू ठेऊ, असे धर्मरक्षक राजधानी सातारच्या मावळ्यांनी सांगितले.या मोहिमेत अभि सुर्वे, रोहन कदम, सागर कर्णे, विशाल जाधव, ओमकार गाढवे, हर्षवर्धन माळी, महेश कदम, विशाल शिंदे, गणेश कदम, अभिजित हुंबे, वैभव माळी, सागर मदने, सुरज कदम, अतुल घाडगे, यश घाडगे, सिंद्धांत तडाखे, मंगेश गायकवाड, प्रणव बनकर, विवेक पवार हे सहभागी झाले होते.