प्रतिनिधी/ रत्नागिरी
संपूर्ण जगभरातील खगोलप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या सूर्यग्रहणाची अनोखी पर्वणी रविवारी रत्नागिरीकरांना अनुभवता आल़ी जिल्हाभरात खंडग्रास स्वरूपात हे ग्रहण दिसल़े सकाळी 10 च्या सुमारास सूर्याला ग्रहणाचा स्पर्श झाला तर साडेअकराच्या सुमारास सूर्यग्रहणाचा परमोच्च बिंदू पहावयास मिळाल़ा ढगाळ वातावरणातही सूर्यग्रहण पाहता आल्याने खगोलप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होत़ा
अनेक वर्षातून येणाऱया सूर्यग्रहणाचा आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीमधील विद्यार्थी अवकाशप्रेमींनी सकाळपासूनच तयारी केली होत़ी भारतातील काही भाग वगळता सर्वत्र खंडग्रास सूर्यग्रहणच पहावयास मिळाल़े रत्नागिरीत सकाळी 10 ते दुपारी दिड वाजेपर्यंत ग्रहण अनुभवता आल़े उघडय़ा डोळ्य़ांनी सूर्यग्रहण पाहणे धोकादायक असल्याने ग्रहण चष्मा, फिल्टर पॅमेरा तसेच विविध उपकरणांचा वापर रत्नागिरीकरांनी केल़ा
रविवारी झालेल्या ग्रहणाबद्दल विविध अफवा पसरल्या होत्य़ा यामध्ये ग्रहणामुळे कोरोना मरून जाईल, जगाचा नाश होईल, असे मेसेजही सोशल माध्यमांवर धुमाकूळ घालताना दिसून आल़े मात्र हे दावे जगभरातील शास्त्रज्ञांनी खोडून काढल़े ग्रहणामध्ये खाणे, पिणे, आंघोळ करणे आदी अशुभ मानले जात़े मात्र या सर्व अंधश्रद्धा असून सूर्यग्रहण ही केवळ अवकाशातील घटना असल्याचे ठासून सांगितल़े