प्रतिनिधी/ रत्नागिरी
पुरुष व महिला गटाची 57 वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत महिला गटात रत्नागिरी जिल्हा संघाने रायगडचा एक डाव 18 गुणांनी मात करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. तर उर्वरित सामन्यात पुरुष गटात अहमदनगर, पुणे, सांगली, ठाणे व मुंबई उपनगर तर महिला गटात सोलापूर, उस्मानाबाद, पुणे व ठाणे या जिह्यांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.
वेळापूर (ता. माळशिरस) येथील पालखी मैदानावर शनिवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. सकाळच्या सत्रात महिलांच्या सामन्यात रत्नागिरी संघाने पहिल्या आक्रमणात 27 गडी बाद केले. रायगड संघाने दोन्ही डावात मिळून 8 गडी बाद केले. रत्नागिरी संघाने हा सामना 1 डाव 18 गुणांनी जिंकला. त्यात अपेक्षा सुतार, आरती कांबळे, श्रद्धा लाड, दिव्या पाल्ये, गौरी पवार यांनी चांगला खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.
उर्वरित सामन्यात पुरुष गटात अहमदनगरने सिंधुदुर्गवर 18-6 अशी एक डावाने मात केली. यात अकाश ढोले याने 4 गुण मिळवित 3.20 मिनिटे संरक्षण करीत अष्टपैलू खेळ केला. आवेज पठाणने 2.50मिनिटे मिनिटे पळती केली. दुस्रया सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरने बीडवर 23-12 अशी एक डावाने नमविले. अक्षय भांगरे याने 5 गडी बाद करीत 1.10 मिनिटे नाबाद खेळी केली. अनिकेत पोटे (2.50 व 2.10 मिनिटे व 2 गुण) याने अष्टपैलू खेळ केला. बीडकडून तुकाराम कराडे (3 गुण) याने एकाकी लढत दिली.
महिला गटात सोलापूरने धुळेवर 22-3 असा एक डावाने दणदणीत विजय मिळविला. शिवानी येंड्रावकरणे आपल्या धारधार आक्रमणात 8 गडी बाद करताना 2.00 मिनिटे नाबाद खेळी करीत अष्टपैलू कामगिरी केली. प्रीती काळे हीने 4.50 व अर्चना व्हनमाने हीने 4.10 मिनिटे नाबाद संरक्षणाची बाजू सांभाळली. संध्या सुरवसे हीने 6 गडी टिपले. दुसऱया सामन्यात उस्मानाबादने पालघरवर 15-6 असा डावाने शानदार विजय मिळविला. यात आश्विनी शिंदे (3.50 मिनिटे व 4गुण), संपदा मोरे (3.00 मिनिटे व 5गुण), किरण शिंदे (2.30 मिनिटे नाबाद व 2गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. पालघरकडून कृपेक्षा महेर (1.10 मिनिटे व 1गुण) हीने एकाकी लढत दिली.
@शनिवारी सकाळच्या सत्रातील अन्य निकाल ः
पुरुष ः पुणे वि.वि.नंदुरबार 19-10 एक डावाने, सांगली वि.वि. जळगाव 27-9 एक डावाने, ठाणे वि.वि. रत्नागिरी 25-11 एक डावाने.
महिला ः रत्नागिरी वि.वि. रायगड 29-8 एक डावाने, पुणे वि.वि. नाशिक 13-11 पाच मिनिटे राखून, ठाणे वि.वि. जालना 21-8 एक डावाने.