लसीच्या जागी पुरळ, लालसरपणा, सूज
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोविड लसीकरणानंतर राज्यातील 7 जिल्हय़ांमध्ये सौम्य साईड इफेक्टची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र ही प्रकरणे गंभीर नसून किरकोळ रिऍक्श्न असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. यामध्ये लस टोचलेल्या जागी पुरळ, लालसरपणा, सूज आदी परिणाम दिसून आल असून हे परिणाम लसीकरणानंतर नैसर्गिक आहेत यासाठी वेगळय़ा उपचाराची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हय़ात लस घेतलेल्यापैकी काही लोकांमध्ये ही सौम्य लक्षणे आढळली असून त्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात शनिवारी 18 हजार 328 आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना कोरोना लस देण्यात आली. लसीकरणानंतर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी प्रत्येक कोरोना लसीकरण सेंटरवर नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी लस घेतलेल्या जागेवर बारीक पुरळ येणे, लालसरपणा, सूज, मळमळ आदी बाबी निदर्शनास आल्या. ही सर्व लक्षणे अपेक्षित लक्षणांपैकीच असून ही सामान्य बाब असल्याचे सांगण्यात आले. अन्य लसीकरणामध्येही काही लोकांना अशी लक्षणे आढळून येतात. अशा प्रकारच्या सौम्य रिऍक्शन्स आढळलेल्या जिल्हय़ांमध्ये सोलापूर, सातारा, जळगाव, औरंगाबाद, रत्नागिरी, जालना आणि लातूर जिल्हांचा समावेश आहे.