प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील कोरोना स्थितीबाबत केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात आली आह़े मागील काही दिवसांपासून जिह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट दिसत असली तरी अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आह़े याबाबत केंद्र सरकाच्या आरोग्य विभागाकडून रत्नागिरीत विशेष उपाययोजना व अधिक लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना राज्य शासनाला देण्यात आल्या आहेत़
कोरोनाची स्थिती बिघडलेल्या 9 जिह्यांबाबत केंद शासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत़ यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, सोलापूर, बीड, रायगड आदी जिह्यांचा समावेश आह़े रत्नागिरी जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 3.83 इतका आह़े राज्याच्या पॉ†िझटिव्हीटी रेटपेक्षा हे प्रमाण अधिक आह़े उच्च पॉ†िझटिव्हीटी रेट असलेल्या जिह्यांमध्ये रत्नागिरी जिह्याचा समावेश झाला आह़े दर आठवडय़ाला 0.30 इतकी वाढ कोरोना रुग्णांमध्ये होत आह़े त्यामुळे रत्नागिरीत विशेष लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केंद्र शासनाकडून करण्यात आल्या आहेत़
जिल्हय़ात 202 नवे बाधित, तिघे मृत
रत्नागिरी जिह्यात रविवारी 5 हजार 930 कोरोना चाचण्या झाल्य़ा यात 202 कोरोनाबाधित रूग्ण आढळले. यातील आरटीपीसीआर टेस्टमध्ये 91 तर ऍन्टीजेनमध्ये 111 रूग्णांचा समावेश आह़े तालुकानिहाय आकडेवारीनुसार मंडणगड-11, दापोली-9, गुहागर-19, खेड-16, चिपळूण-62, संगमेश्वर-12, रत्नागिरी-59, लांजा-2, राजापूर-12 असे रुग्ण सापडले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71 हजार 725 इतकी आह़े तर मागील 24 तासात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा यात चिपळूणमध्ये 1 तर रत्नागिरीतील 2 जणांचा समावेश आह़े एकूण मृतांचा आकडा 2 हजार 86 इतका असून मृत्यूदर 2.91 इतका आह़े तसेच रविवारी बरे झालेल्या 189 जणांना घरी सोडण्यात आल़े बरे झालेल्यांची एकूण संख्या 67 हजार 312 इतकी आह़े तर उपचारात असलेल्यांची संख्या 2 हजार 217 इतकी आह़े