प्रतिनिधी/ रत्नागिरी
एकीकडे राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत आहे. पण रत्नागिरीतील मुस्लीम बांधवांनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणारी आहुजा कंपनीची अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे शांतता कमिटीच्या बैठकीत जाहीर केले. मुस्लीम समाजाच्या या निर्णयाचे शांतता कमिटीतर्फे कौतुक करण्यात आले. रत्नागिरीतील हा सर्वधर्मीय सलोखा कायम रहावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी शहर पोलीस स्थानक अंतर्गत शांतता कमिटीची बैठक बुधवारी पार पडली. येत्या 3 मे रोजी रमजान ईद, अक्षय तृतिया हे दोन सण साजरे होणार आहेत. त्यामुळे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्यावतीने रफीक बिजापूरकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. रत्नागिरीतील मुस्लीम बांधवांनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणारी आहुजा कंपनीची अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहाटेच्या सुमारास अत्यंत कमी वेळात व कमी आवाजात अजान दिली जाईल. इतर वेळीही मर्यादित आवाजात अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात होणार असल्याचे बिजापूरकर यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
या बैठकीत उपस्थित शांतता कमिटीच्या सदस्यांनी मनोगते व्यक्त केली. रत्नागिरी जिह्यात विविध धर्माचे, जातीचे लोक वास्तव्याला आहेत. परजिह्यासह राज्यात, देशात कोणतीही अनुचित घडली तरी येथील सर्वधर्मियांचा सलोखा कायम राहिला आहे, यापुढेही तो राहिल, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनीही रत्नागिरीत हिंदू-मुस्लीम बांधव लहानपणापासून एकत्रित रहात आहे. भोंग्याचा आवाज मर्यादित झाल्यास मनसेचा कोणताही आक्षेप नाही. सर्व समाजबांधव एकत्रितपणे सण, उत्सव साजरे करणार असल्याचे स्पष्ट केले.
शांतता समितीच्या या बैठकीला श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, कर्मचारी नेते सुधाकर सावंत, पत्रकार राजेंद्र चव्हाण, हेमंत वणजू, आरपीआयचे एल. व्ही. पवार, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नीलेश भोसले, बांधकाम व्यावसायिक महेश गुंदेचा, मराठा मंडळाचे पदाधिकारी केशवराव इंदुलकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) एस. एल. पाटील, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, महेश कुबडे आदी उपस्थित होते.
सर्व धर्मियांमध्ये कायमस्वरूपी सलोखा ठेवाः डॉ. गर्ग सोशल मिडियाचा वापर हा प्रत्येकाचा हक्क असला तरीही आपल्या पोस्टमुळे कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. व्हॉटस्ऍप ऍडमिननेही या बाबत सदस्यांना सूचना द्याव्यात. हिंदू-मुस्लीमांसह सर्व समाज येथे एकोप्याने राहतात. केवळ सणांपुरते नव्हे तर कायमस्वरूपी सर्व धर्मियांमध्ये सलोखा राहील, यासाठी सर्व रत्नागिरीकरांनी प्रयत्न करावेत. शेकडो वर्षांची ही परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्साहात सण साजरे करावेत, असे