प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लॉकडाऊन काळात लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी नगर परिषदेमार्फत भरवण्यात येणारे आठवडा बाजार बंद करण्यात आले. मात्र अजूनही हे संकट कायम असल्याने सध्यातरी आठवडा बाजार सुरू करण्याबाबत न.प.मार्फत विचार नसल्याचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे साऱया बाजारपेठांतील व्यवहारांवर निर्बंध आले होते. मात्र अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम आहे. तरीही लॉकडाऊनची वाटचाल अनलॉककडे सुरू आहे. रत्नागिरीत प्रारंभाच्या काळापेक्षा आताची कोरोनाची स्थिती कमी प्रमाणात असली तरीही धोका कायम आहे. हे संकट अजूनही दूर झालेले नसल्याने नागरिकांसाठी खबरदारीची नितांत गरज आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता बाजारांमध्ये होणाऱया गर्दीवर नियंत्रण कसे राहिल, याकडे नगर परिषदमार्फत लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे बंद असलेले आठवडा बाजार अजूनही सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय नगर परिषदस्तरावर घेण्यात आलेला नाही. त्यासाठी कोरोनाचे संकट दूर होण्याची प्रतीक्षा असल्याचे साळवी यांनी सांगितले.