किराणा, दूध 7 ते 11 या वेळेत फक्त घरपोच
प्रतिनिधी/रत्नागिरी
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 जून ते 8 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने तसेच जिह्यातील कोव्हीड पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 20 टक्के आहे. 67 पेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्याप्त आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्ह्याच्या हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने 2 जून रोजी सकाळी 7 ते 8 जून, 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत हे कडक निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने आदेश देण्यात आले आहेत.
जिह्यात काय सुरू काय बंद?
जिल्ह्यात औषध दुकाने, आरोग्य विषयक सेवा व आरोग्य विषयक आस्थापना पूर्णवेळ सुरु राहतील. याव्यतिरिक्त कोणतीही दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहतील. दूध व किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत पुरवता येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यातून प्रवेश करण्यास किंवा अन्य जिह्यात प्रवास करण्यास बंद करण्यात येणार आहेत. केवळ नातेवाईकाचे अंत्यसंस्कार, वैद्यकीय उपचार व कोव्हीड-19 व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा आणीबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्हÎात प्रवेश किंवा जिल्हÎातून अन्य जिल्हÎात प्रवासाला मुभा राहील. जिल्हÎात प्रवेश करणाऱया कोणत्याही व्यक्तीला 48 तास अगोदर केलेली कोव्हीड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
या कालावधीत मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. अशी मालवाहतूक केवळ दुकानापर्यंत, आस्थापनेपर्यंत माल वितरण करण्यापुरती मर्यादीत राहणार आहे. अशा वाहनांतून कोणत्याही ग्राहकाला थेट माल पुरवता येणार नाही. याबाबत नियमाचा भंग केलेला आढळल्यास अशा मालवाहतुकदाराची सेवा कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषीविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. हे आदेश प्रतिबंधीत क्षेत्र वगळून संपूर्ण रत्नागिरी जिह्याच्या क्षेत्रासाठी लागू राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
आजपासून 200 गावात संस्थात्मक विलगीकरण सुविधा
कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार जिल्हयात 1 जूनपासून `माझं गाव माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. गृहविलगीकरण बंद करुन ग्राम कृतीदलांच्या मदतीने 200 गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी ही माहिती दिली.
प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 जणांच्या चाचण्या हे उद्दीष्ट ठरवून तालुक्यांच्या ठिकाणी मोबाईल तपासणी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱया गावात शाळा, मंगल कार्यालये अशा जागांवर संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था करणे तसेच तपासणी झालेल्या व्यक्तीला तपासणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत इतरांमध्ये मिसळू न देणे या बाबी केल्या जातील. यासाठी काही कमी लोकसंख्येच्या गावांनी पुढाकार घेतला तरी त्यांना संमती द्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हयात सर्वत्र ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी रत्नागिरी शहराप्रमाणे मोबाईल लसीकरण सुरु करण्याच्या सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या. नोकरी अथवा शिक्षणासाठी परदेशात जाणाऱया व्यक्तीना कागदपत्रांची तपासणी करुन पात्र व्यक्तीचे लसीकरण विना नोंदणी करण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या.