प्रतिनिधी/ रत्नागिरी
बांधकाम, घरेलू महिला आणि सुरक्षारक्षक कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय मजदूर संघ जिल्हा रत्नागिरीच्यावतीने सोशल डिस्टन्स पाळत सरकार जगावो अभियान आंदोलन करण्यात आले.
भारतीय मजदूर संघातर्फे जिल्हा रत्नागिरीच्यावतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी लढा देण्यात येत आह़े या आंदोलनाच्या माध्यमातूनही संघटनेतर्फे सरकारला जागे करून कामगारांच्या विविध मागण्यांची पूर्तता होण्याचा प्रयत्न सुरू आह़े आंदोलनावेळी जिल्हाधिकाऱयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आल़े यावेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव संजना वाडकर, बांधकाम कामगार महासंघ रत्नागिरी जिल्हाध्यक्ष परशुराम नाचणकर, महिला घरेलू कामगार महासंघ जिल्हाध्यक्ष कांचन गोताड, बांधकाम कामगार महासंघ जिल्हा सचिव ऋतिका पिलणकर, घरेलू महिला कामगार महासंघ जिल्हा सचिव उर्मिला पागी सहभागी झाल्या होत्य़ा
दिलेल्या निवेदनात बांधकाम कामगारांचे नोंदणीकरण व त्यांना मिळणाऱया कामाची वेळ निश्चित असाव़ी सर्व बांधकाम कामगारांना राष्ट्रीय ओळखपत्र †िदले जावे, त्यांना रेशनकार्ड, राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, वेल्फेअर मंडळाचा अध्यक्ष कामगार संघटनापैकी असावा, बांधकाम कामगारांसाठी फिरते आरोग्य तपासणी पेंद्र उपलब्ध कराव़े तसेच घरेलू महिला कामगारांचे मंडळ पुर्नस्थापित करावे, घरेलू कामगारांना आरोग्य सेवा देण्यात यावी, घरेलू कामगार म्हणून मान्यता द्याव़ी घरेलू कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा द्याव्यात़ त्यांच्या सन्मान धन योजनेचे पूर्वलक्षी प्रभावाने पुर्नस्थापना व्हावी, त्याचप्रमाणे सुरक्षारक्षकांचा मागण्यांमध्ये सर्व शासकीय कार्यालये, आस्थापना, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना येथे सुरक्षारक्षक मंडळातर्फे सुरक्षारक्षक नेमावेत व हे सक्तीचे करावे, सुरक्षारक्षक महामंडळ तसेच माजी सैनिक महामंडळाच्या सुरक्षारक्षक मंडळात समावेश करून सर्व जिल्हास्तरीय मंडळाचे एकत्रिकरण करून एकच सुरक्षारक्षक मंडळ स्थापन करावे, सुरक्षारक्षक मंडळाचा अध्यक्ष अशासकीय असावा, सर्व सुरक्षारक्षकांना सर्व शासकीय लाभ देण्यात यावेत, सरकारी कर्मचारी दर्जा देण्यात यावा, सुरक्षारक्षक मंडळाच्या सर्व सुरक्षारक्षकांना खाकी/लष्करी युनिफॉर्म देण्यात यावा, आदींसह विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आह़े