प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने यंदाच्या (2021-22) शैक्षणिक वर्षापासून मान्यता दिली आह़े यासह 60 प्रवेश क्षमतेच्या 5 अभ्यासक्रमांसह हे महाविद्यालय सुरु करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आह़े यामुळे या वर्षीपासून कोकणातील विद्यार्थ्यांचे अभियंते होण्याचे स्वप्न सुलभ होणार आह़े
रत्नागिरीत नव्याने सुरु होणाऱया अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेपॅट्रानिक्स, सिव्हील व इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरींग, आर्टिफिशिअल इंटेलिजेंन्स व डाटा सायन्स, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग व फुड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट असे 5 अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी 60 अशा 300 प्रवेश क्षमतेचे हे पदवी महाविद्यालय ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर यांच्याची संलग्न असणार आह़े सद्यस्थितीमध्ये सुरु असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्येच हे महाविद्यालय सुरु होणार असून नव्या महाविद्यालयासाठी इमारतही तयार असल्यामुळे पदवी महाविद्यालय सुरु करण्यामध्ये कोणतीही अडचण होणार नाह़ी, असे सांगितले जात आहे.
उदय सामंत यांची गोड भेट
रत्नागिरी येथे नव्या महाविद्यालयासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व मतदार संघाचे आमदार उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले होते. याचवर्षी हे महाविद्यालय सुरु करण्याचा शब्द त्यांनी जिल्हावासियांना दिला होता. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांना ही गोड भेट देऊ केली आहे. कोरोनाच्या नकारात्मक काळात ही एक सकारात्मक बाब मानली जात आहे. कोकणच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये हे महाविद्यालय मोलाची भर टाकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.