प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबतची घोषणा केली. बुधवारपासून जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक वाहने वगळता जिल्ह्यात सर्व दुचाकी, तीन चाकी, चारचाकी बंद राहणार आहेत.
सरकारी कर्मचारी १० टक्के उपस्थितीत सुरू राहणार असून प्रायव्हेट सेक्टर आठ दिवस बंद राहणार आहे. कन्टनमेंट झोन अधिक कडक करणार असून ‘ब्रेक द चेन’ नावानी आठ दिवस पुर्णपणे लॉग डाउन राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना बाहेर पडण्यास.मज्जाव असून सायंकाळी नाईट कर्फ्यु लागू होणार आहे. नाईट कर्फ्यू अधिक कडक करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.