रत्नागिरीत ‘सुट’वारुन रंगले राजकीय नाटय़
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरात काही दिवसांपुर्वी रंगलेल्या ‘सुट’च्या राजकारणाची चर्चा आता पुढे येऊ लागली आहे. हा सूट म्हणजे समारंभात परिधान करण्याचा नसून वास्तव्यासाठीच्या शासकीय व्यवस्थेतील आहे. पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्हय़ात आलेले पालकमंत्री ऍड. अनिल परब यांना दिलेल्या सुटपेक्षा भारी सुट (कक्ष) अन्य लोकप्रतिनिधीला दिल्याचा झालेला आरोप, त्याची शहानिशा व त्यातून सत्ताधारी पक्षातील शह-काटशहाच्या राजकारणाची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी काही दिवसांपुर्वीच जिल्हय़ाचा पहिला दौरा केला. परब यांच्या दौऱयाची संधी साधून त्यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून करण्यात आला. त्यासाठी त्यांना आपल्या घरी नेवून आग्रहपुर्वक पाहुणचारही करण्यात आला.
पालकमंत्र्यांचा रहिवास शासकीय विश्रामधामावर होता. बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महत्वाचे लोकप्रतिनिधी भेटले, त्यानंतर विश्रामगृहावर आणखी गाठीभेटी सुरु होत्या. पालकमंत्री परब यांच्यासाठी ‘अश्विनी’ कक्ष आरक्षित होता. मात्र अचानक कोणीतरी बांधकाम खात्याच्या कर्मचाऱयांना विचारणा केली. यापेक्षा सरस असलेला ‘अनुराधा’ का दिला नाही. संबधीत कक्ष दुसऱया लोकप्रतिनिधींसाठी आरक्षित असल्याचे कर्मचाऱयांनी सांगितले.
पालकमंत्री पॅबिनेट दर्जाचे असून त्यांच्यापेक्षा सरस पुढारी कोण अशी विचारणा करण्यात आली. मात्र असा कोणताही भेदभाव केला नसल्याचे बांधकाम विभागाच्या कर्मचाऱयांनी सांगितले. दोन्ही कक्षांमध्ये सारख्याच सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रकरण तेवढय़ावर थांबेना. अखेर संबधीत नेत्याने समोरच असलेल्या अनुराधा कक्ष उघडायला लावला. पालकमंत्री परब यांना कक्षात बोलावून बांधकाम कर्मचारी कसा भेदभाव करत आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
पालकमंत्र्यांनी दोन्ही सूटची पाहणी केली, संबधीत नेत्याचेही म्हणणे ऐकून घेतले. मात्र या सर्व प्रकरणावर कोणतेही भाष्य करण्याचे टाळत त्यांनी राजकीय मुत्सद्देगिरीचा प्रत्यय दिला. मात्र पक्षात सुरू असलेल्या या अंतर्गत शीतयुद्धाची त्यांनी नक्कीच दखल घेतली असेल. या संघर्षावर तोडगा काढून पक्षसंघटना भक्कम करण्यासाठी पालकमंत्री काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.