प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश जिल्हा अंतर्गत सेवा 12 जूनपासून सुरू होणार असून रत्नागिरी टप्याटप्याने शहर बस वाहतूक सह जिल्हा अंतर्गत सेवा सुरू करण्यात येणार आहे मात्र 22 पेक्षा अधिक प्रवाशी एसटी त घेतले जाणार नाही. सोशल डिस्टस्टींग ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. त्यामुळे उद्यापासून केवळ जिल्ह्यातील एसटी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.