बेमुदत संपावर अजूनही तोडगा नाही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून हा संप मागे घेण्यासाठी शासनाकडून दबावतंत्राचा वापर सुरू आहे. जिल्ह्य़ातील 143 कर्मचारी आतापर्यंत कामावर हजर झाले असून संपामध्ये सहभागी रत्नागिरी विभागातील 86 कर्मचाऱयांचे आतापर्यंत निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री चिपळुणातील 6 कर्मचाऱयांचे निलंबन तर रोजंदारी गट क्रमांक 1 मधील 49 कर्मचाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
शासनाकडून अजूनही एसटी कर्मचाऱयांच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. ठोस निर्णय झाल्याशिवाय कर्मचारी मागे हटण्याची चिन्हे नाहीत. शासनाकडून कर्मचाऱयांना संपातून माघार घेण्यासाठी 24 तासाचा अल्टिमेट देण्यात आला आहे. मात्र आपली मागणी शासनाकडून मार्गी लागत नाही, तोपर्यंत संपातून माघार नाही, या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम आहेत.
कर्मचाऱयांची ताठर भूमिका मोडून काढण्यासाठी शासनाकडूनही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. संपातील कर्मचाऱयांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. ज्या कर्मचाऱयांनी या संपात राहून एसटी बस सुरू करण्यात अडथळे आणले त्या कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई केली आहे. रत्नागिरी विभागात आतापर्यंत 86 एसटी कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामध्ये पूर्वी 27 तर आता नव्याने 59 कर्मचाऱयांचा समावेश असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले आहे. कामावर हजर होण्याच्या एसटी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी विभागातील 143 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
दहा दिवसात आगारातून केवळ एक फेरी धावली
चिपळूण ः एसटी कर्मचाऱयानी पुकारलेला संप बुधवारी दहाव्या दिवशीही कायम होता. या संपात सहभागी कर्मचाऱयांवर महामंडळ प्रशासनाने आता कारवाई सुरू केली असून मंगळवारी रात्री येथील 6 कर्मचाऱयाचे निलंबन तर रोजंदारी गट क्रमांक 1 मधील 49 कर्मचाऱयाना कारणे दाखवा नोटीस बजावली आाहे.
कोकणातील मध्यवर्ती असलेल्या चिपळूण बसस्थानकातून गेल्या 10 दिवसात केवळ एक रत्नागिरी फेरी वगळता बसची चाके रुतलेलीच आहेत. या आगारातून दिवसाला एकूण 654 फेऱया, 34 हजार 256 कि.मी. अंतर येऊन-जाऊन कापतात. मात्र संपामध्ये आगाराचे सर्वच चालक-वाहक सहभागी असल्याने हे बसस्थानक सध्या ओस पडले आहे. अशातच संपात सहभागी 6 कर्मचाऱयांवर निलंबन कारवाई सुरू केली असून बुधवारी सायंकाळी रोजंदारी गट क्रमांक 1 मध्ये काम करणाऱया 49 चालक कम वाहकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 24 तासात कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीचे या नोटीसीत नमूद केले आहे.
बसफेरी नेणाऱयालाही नोटीस?
दरम्यान संप सुरू असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धाडस दाखवत रत्नागिरी फेरी चालवलेल्या चालक कम वाहन सुशांत आंब्रे यांचाही कारणे दाखवा नोटीसीमध्ये समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
24 तासात हजर होण्याचा अल्टीमेटम!
संपाची हाक देणाऱया एसटी कर्मचाऱयांपैकी 84 कर्मचाऱयांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले असून रोजंदारी व कर्मचाऱयांनी 24 तासाच्या आत कामावर रुजू होण्याची नोटीस जारी केल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहत्तर यांनी दिल़ी
प्रशानातर्फे कर्मचाऱयांनी कामावर हजर होण्याचे आवाहन करुनही प्रतिसाद लाभत नसल्याने निलंबनाची कार्यवाही सुरु आहे. मंगळवारी रत्नागिरी विभागातील आणखी 57 एसटी कर्मचाऱयांचे निलंबन झाल्याने निलंबन झालेल्यांची एकूण संख्या 84 झाली आह़े त्यापुढे जात कर्मचाऱयांनी 24 तासात कामावर हजार व्हावे, अशी नोटीस फलकावर लावण्यात आली आह़े गेल्या आठवडय़ात 27 व मंगळवारी 57 कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आल़े यामध्ये लांजा आगारातील 12, चिपळूणमधील 6, देवरुख 5, दापोली 17, गुहागर 4, मंडणगड 7 व खेड आगारातील 6 कर्मचाऱयांचा समावेश आह़े