प्रतिनिधी/रत्नागिरी
जिल्ह्यात आज दिवसभरात तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोकणनगर, रत्नागिरी येथील 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच राजापूर येथील 58 वर्षीय तर हर्णे, दापोली येथील 67 वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 66 झाली आहे.
तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे
रत्नागिरी – १६
खेड – ६
गुहागर – २
दापोली – १४
चिपळूण – १३
संगमेश्वर – ७
लांजा – २
राजापूर – ५
मंडणगड – १