प्रतिनिधी / रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील असुर्डे धरणात बुधवारी महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळले. मात्र त्यांनी आत्महत्या केली की बुडाले याबाबत तपास सुरू आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे तिघेही काल धरण परिसरात लाकडे आणण्यासाठी गेलेले होते. त्यानंतर ते घरीच परतले नाहीत. गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर सकाळी त्यांना धरणाच्या पाण्यात तिघांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात दिसून आले.
मयुरी बाबाराम चौगुले (३५) हर्ष बाबाराम चौगुले(११) शारदा बाबाराम चोगले (१३) अशी नावे आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे.