प्रतिनिधी/ रत्नागिरी
जानेवारीपासून नोव्हेंबर 2020 पर्यंत राज्यात 159 बिबटय़ांचा मृत्यू झाला आह़े गेल्या 5 वर्षात हा सर्वोच्च मृत्यूदर आह़े माणसांना मारणारे 23 हल्ले बिबटय़ाकडून या कालावधीत झाले आहेत़ ते गेल्या 10 वर्षात सर्वाधिक आहेत़ वनविभागाकडे ही आकडेवारी गोळा झाल्यानंतर वनविभागाने रत्नागिरीसह आणखी काही जिह्यांची गणना या संदर्भात ‘हॉटस्पॉट’ म्हणून केली आह़े
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी पत्रकारांना सांगितले की, रत्नागिरी, औरंगाबाद यासह साखर पट्टय़ातील पुणे, कोल्हापूर, सांगली, उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा यासह नाशिक, नगर या विभागांना बिबटय़ासंदर्भात हॉटस्पॉट म्हणून नोंदवण्यात आले आह़े बिबटय़ांच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी एक विशेष कार्यक्रम येत्या 2 वर्षात हाती घेण्यात येणार आह़े सांगली जिह्यातील संगमेश्वर अभयारण्यात प्रथमच बिबटय़ाचे दर्शन झाल़े
दिल्ली येथील वाईल्ड लाईफ सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने महाराष्ट्रातील बिबटय़ांच्या मृत्यूसंदर्भात अंदाज व्यक्त केला आह़े 2010 साली 30 मृत्यू, 2011 साली 34 मृत्यू, 2012 साली 43 मृत्यू झाले असाव़े 2013 सालात 36, 2014 मध्ये 41, 2015मध्ये 46 बिबटय़ांचे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े रस्ता अपघातात 22 बिबटे 2018 साली मारले गेल़े अशाच दुर्घटनांमध्ये 2019 साली 19 बिबटे तर तेवढेच बिबटे 2020 साली मारले गेल़े
या संस्थेने म्हटले आहे की, तुटक स्वरूपातील जंगले, जंगलाबाहेरील सलग बांधकामे यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत़े यासाठी व्यापक कृती कार्यक्रमाची गरज आह़े वन खात्यानेही बिबटय़ांच्या मृत्यूची आकडेवारी नोंदवली आह़े जानेवारी ते नोव्हेंबर 2020 दरम्याने 159 बिबटे मारले गेल़े त्यापैकी 80 जणांचा मृत्यू नैसर्गिकरितीने झाला तर 64 बिबटे वेगवेगळ्या अपघातांमध्ये मारले गेल़े रस्ता अपघात, रेल्वे अपघात, विहिरीत पडून मृत्यू अशा कारणाने बिबटय़ांचा मृत्यू झाल़ा काही ठिकाणी कुत्र्यांनी एकत्र येऊन बिबटय़ाला ठार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत़ 2013 साली 17 लोकांना बिबटय़ाने मारल़े बिबटय़ांनी बदलत्या जीवनशैलीचे आव्हान स्वीकारल़े त्यामुळे त्यांची संख्या वाढताना †िदसत आह़े, असे वनखात्याने म्हटले आह़े
रत्नागिरी जिह्यात ठिकठिकाणी बिबटय़ाचा वावर असल्याने शेतकरीवर्ग दहशतीखाली आह़े रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यांमध्ये बिबटय़ा आढळल्याच्या घटना गेल्या महिन्यात घडल्या आहेत़ याशिवाय चिपळूण, गुहागर, खेड, दापोली व मंडणगड याही तालुक्यात बिबटय़ांचे दर्शन झाल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आह़े पावस तालुका रत्नागिरी परिसरात बिबटय़ाने अनेक लोकांवर हल्ले चढवले आहेत़ या विभागात वनविभागाने गस्त ठेवली आह़े गस्तीवर असलेल्या जवानांना चुकवण्याचे कौशल्य बिबटय़ांनी मिळवले असल्याचा समज लोकांमध्ये पसरला आह़े