प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात आज ११९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८५५ वर पोहोचली आहे. तर आणखी तिघांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या 145 झाली आहे.
आज चिपळूणमधील ७५ वर्षीय, लांजामधील ८५, खेडमधील ५६ वर्षीय अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला. ५ हजार ४५६ लोक होम क्वारंटाइन आहेत. आज ४१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३ हजार १८वर पोहोचली आहे.
नव्या रुग्णामध्ये आरटीपीसीआर चाचणीत गुहागर ३, चिपळूण १७, रत्नागिरी ३३, लांजा २ असे एकूण ५५ तर अँटीजेन टेस्टमध्ये संगमेश्वर १, खेड २४, गुहागर ६, चिपळूण २, रत्नागिरी २६, लांजा ५ असे ६४ पॉझिटिव्ह सापडले आहेत.