नव्या ५६ रूग्णांची भर, मृत्यूचे प्रमाण ३.६ वर
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. शुक्रवारी ८८ कारोनामुक्त झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ७ हजार ३८ इतकी झाली आहे तर शुकवारी ५६ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. एका कोरोना रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली आहे.