कोरोनामुळे 9 महिने न्यायालये बंद
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील विविध न्यायालयात एकूण 23 हजार 992 खटले प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आह़े यामध्ये 13 हजार 592 फौजदारी तर 10 हजार 400 दिवाणी स्वरूपाचे खटले प्रलंबित आहेत़ कोरोना काळामुळे जवळपास 9 महिने न्यायालयाचे नियमित कामकाज बंद ठेवण्यात आले होत़े याचा देखील परिणाम प्रलंबित खटले निकाली काढण्यावर झाला असल्याचे दिसून येत आह़े
प्रलंबित खटल्यांमध्ये मागील एक वर्षामधील 6 हजार 986, एक ते तीन वर्षामधील 9 हजार 895, मागील तीन ते पाच वर्षामध्ये 3 हजार 911, मागील पाच ते 10 वर्षामध्ये 2 हजार 744, मागील दहा ते वीस वर्षामध्ये 391 मागील 20 ते 30 वर्षामध्ये 39 तर तीस वर्षापूर्वीचे 26 खटले प्रलंबित असल्याची माहिती नॅशनल ज्युडीशिअल डेटा ग्रीड संकेतस्थळावर दिसून येत आह़े दरम्यान प्रलंबित खटल्यांचां निपटारा करण्याविषयी विविध उपाययोजना सर्वोच्च व उच्च न्यायालयाकडून करण्यात येत आहेत़ तरीदेखील दिवसेंदिवस खटल्यांची संख्या वाढत असल्याने त्याचा परिणाम प्रलंबित खटल्यांवर होत आह़े
राज्यातील सर्वच न्यायालयामध्ये न्यायाधीशांची कमतरता असल्याने खटले प्रलंबित राहत आहेत़ तसेच सध्या स्थितीत फौजदारी व †िदवाणी स्वरूपाच्या खटल्यांमध्ये देखील वाढ होत आह़े न्यायाधीशांची संख्या वाढवून प्रलंबित खटले निकाली काढल्याचे गृहीतक मांडण्यात येत होत़े मात्र अशा प्रकारे अचानक न्यायाधीशांची संख्या वाढविणे शक्य नसल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े देशभरातील सर्वच न्यायालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर खटले प्रलंबित असल्याचे दिसून येत आह़े
नॅशनल ज्युडीशिअल डेटा ग्रीड च्या माहितीनुसार संपूर्ण भारतामध्ये 3 कोटी 29 लाख खटले प्रलंबित आहेत़ यामध्ये यामधील जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालयात 28 लाख खटले मागील 10 वर्षापेक्षा अधीक काळापासून प्रलंबित राहिले आहेत़ तर 85 हजार खटल्यांचा 3 दशाकांपेक्षा अधीक काळापासून निकाल लागला नसल्याची आकडेवारी समोर आली आह़े तसेच देशभरातील 25 उच्च न्यायालयात 47 लाख खटले मागील 10 वर्षापेक्षा जूने आहेत़ तर 46 लाख 754 खटले हे 30 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित राहिले आहेत़ त्यामुळे सर्वच ठिकाणी प्रलंबित खटल्यांचे प्रमाण अधीक असल्याचे दिसून येत आह़े