पायरी आंब्याची अद्याप प्रतीक्षा, ग्राहकांअभावी विक्री रोडावली
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहर परिसरामध्ये सुरु झालेल्या टाळेबंदीमुळे हापूस विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात झळ बसायला सुरुवात झाली आह़े. आधीच उत्पादन कमी आहे, त्यात टाळेबंदीमुळे पर्यटकांसह नागरीकांना फिरण्यासाठीच्या निर्बंधामुळे शहर परिसरामध्ये हापूस विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात हाल होत आह़े.
शहरामध्ये धमालनीचा पार, पऱ्याची आळी येथे मोठ्या प्रमाणात हापूस विक्री करताना विक्रेते आढळून येतात़. मात्र टाळेबंदीमुळे फक्त 2 ते 4 विक्रेते हापूसची विक्री करताना आढळून आले आहेत़. गुरुवारी पोलीस प्रशासनाने टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केल्यामुळे या विक्रेत्यांकडे दिवसभरात एकही ग्राहक आले नसल्याची माहीती येथील हापूस विकेत्यांनी दिल़ी, तसेच हापूससह पायरी आंबा देखील विक्रीसाठी येत असत़ो, मात्र यंदा पायरी आंब्याची एक केटची देखील आवक झाली नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आह़े यामुळे टाळेबंदीमुळे यंदा मोठा आर्थिक फटका या विकेत्यांना बसत आह़े.