आता होणार सोमवारी आंदोलन
प्रतिनिधी / दापोली
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतमध्ये मनमानी व बेकायदा कारभार होत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी दापोलीतील नागरिकांच्या वतीने मंगळवारी नगरपंचायतच्या विरोधात थाली बजाव आंदोलनाचा इशारा दिला होता.
मात्र, मंगळवारी सकाळपासून सुरू असणाऱ्या धुवांधार पावसाने यात व्यत्यय आणला. यामुळे आता हे आंदोलन पुढच्या सोमवारी 28 सप्टेंबर रोजी होणार आहे मात्र राष्ट्रवादीने सर्व नागरिकांच्यावतीने या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी मनसे व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.