प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसून येत होते. परिणामी कोरोनामुळे होणारे मृत्यूच्या घटना देखील समोर येत आहेत. मंगळवारी दापोली तालुक्यातील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे केवळ ६ रूग्ण आढळून आले आहेत. तर १८ रूग्ण हे कोरोनामुक्त होवून घरी परतले.
मंगळवारी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून करण्यात आलेल्या कोरोनाचे २१५ चाचण्यांपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये शून्य तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये ६ कारोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यातील रत्नागिरी तालुक्यात ४, चिपळूण १ व दापोली तालुक्यात एक रूग्ण मिळून आला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ८१५ इतकी झाली आहे तर मंगळवारी कोरोनापासून बरे झालेल्या १८ रूग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या ८ हजार २९८ वर पोहचले आहे. जिल्ह्यातील बरे होण्याचे पमाण ९४.१३ इतके आहे.
मृतांच्या तालुकानियाह आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक ८८, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३३, चिपळूण ७६, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४ तर मंडणगडमध्ये ३ असे एकूण ३२१ जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संबंधित कोणतीही लक्षणे असल्यास वेळेत तपासणी करून घ्यावी असे अवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
एकूण रूग्ण – ८८१५
नवे रूग्ण -०६
नवे मृत्यू -०१
एकूण मृत्यू -३२१