मासेमार धास्तावले
वार्ताहर / मौजेदापोली
कोकण किनारपट्टीवर सध्या वहात असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे येथील मच्छीमार कमालीचे धास्तावले आहेत. वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका पुन्हा जवळच्या खाडी भागात आल्या आहेत. गेले चार ते पाच दिवसांपासून हर्णै येथील मच्छीमारांनी मासेमारी बंद ठेवली आहे. तर वादळी वार्यामुळे आपल्या नौकांनी आंजर्ले, रायगड जिल्ह्यातील मुरूड, जयगड, दाभोळ अशा खाड्यांमध्ये आश्रय घेतल्याचे मच्छीमार महेंद्र चोगले यांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वी हर्णै येथील काही नौका मासेमारीकरण्यासाठी गेल्या होत्या. परंतु वादळी वाऱयांसह पावसाचा हवामान खात्याने इशारा दिल्यामुळे नौका किनार्याला आणण्यात आल्या. 4 दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या नौका किनाऱयावर आणल्यानंतर पुन्हा पावसाची व वादळाची शक्यता वर्तविण्यात आल्याने अजून दोन ते चार दिवस नौका किनाऱयालाच राहणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे मासळीचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे खवय्ये नाराज आहेत