प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील हर्णै येथील अर्चना आबुर्ले आणि मयुरेश आबुर्ले करीता मुखत्यार असलेले नवेद सय्यद यांना रत्नागिरी अप्पर जिल्हाधिकारी यांचे 28 नोव्हेंबर 2018 रोजीच्या आदेशान्वये हर्णै येथील स. नं. 215/13 अ पैकी क्षेत्र 1358 चौमी या जमिनीमध्ये केलेले अनधिकृत बांधकाम स्वखर्चाने काढून टाकावे असा आदेश दापोली प्रांताधिकारी यांनी दिला आहे. सदर बांधकाम पाडण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु आता 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढीव देण्यात आली आहे.
संबंधितांनी दिलेल्या मुदतीत बांधकाम न काढल्यास मुदतीनंतर सदरचे बांधकाम शासकीय यंत्रणेमार्पत हटविण्यात येईल व त्याचा खर्च संबंधांकडून वसूल केला जाईल असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. हर्णै येथील शोभिवंत मत्स्य व्यावसायिक हनुमंत सारंग यांच्या तक्रारी अर्जावरून ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे सारंग यांच्या तक्रार अर्जाला आता खर्या अर्थाने न्याय मिळाल्याचे हर्णैतून बोलले जात आहे. तसेच यामुळे बेकायदा बांधकाम करणार्यांना आळा बसेल असे देखील बोलले जात आहे.