प्रतिनिधी/ रत्नागिरी
सेंटर ऑफ एक्सलंट (एमएसडीपी) अंतर्गत रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन अद्ययावत केले जाणार आहे. महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत पॅम्पस असलेले पहिले तंत्रनिकेतन अशी त्याची ओळख होणार आहे. त्यासाठी 25 कोटीचा निधी मंजुर झाला असून पहिल्या टप्प्यात साडे बारा कोटी दिले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय तंत्रनिकेतनचा पॅम्पस विकसित करण्याच्यादृष्टीने आमचा प्रयत्न आहे. अद्ययावत आणि आकर्षक अशा इमारीत उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 25 कोटी रुपये देण्यात येतील. सेंटर ऑफ एक्सलंट या योजनेतून हा विकास होईल. पहिल्या टप्प्यात साडे बारा कोटी दुसऱया टप्प्यात साडे बारा कोटी दिले जातील. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर भर आहे. कोर्सेस वाढविण्याचा प्रयत्न आहे. मरिन, पर्यटन, बीच शॅक आदी रोजगार निर्मितीच्यादृष्टीने पूरक अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.
इंजिनिअरिंग कॉलेजची नांदी
तंत्रनिकेतनचे अद्ययावतीकरण हे पुढील वर्षी येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल आहे. महाराष्ट्रात दिमाखदार असा रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतनचा हा पॅम्पस असले. कर्मचारी वसाहतीच्या इमारती देखील सुसज्ज केल्या जाणार आहेत. शासकीय तंत्रनिकेमध्ये यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1014 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
तंत्रनिकेतनच्या नियोजित बांधकामाचे यावेळी प्रेझेंटेशन झाले. सुमारे 50 कोटीचा आराखडा सादर करण्यात आला. मात्र या सादरीकरणात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचा मुद्दाच नसल्याने सामंत यांनी हे प्रेझेंटेशन थांबविले. विद्यार्थ्यांच्या अपग्रेडेशनला आदी प्राधान्य द्या, त्यानंतर या इमारती उभ्या करुया, असे स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप आदी पदाधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.