प्रतिनिधी/रत्नागिरी
जोपर्यंत शासन 100 टक्के पेक्षकांना चित्रपटगृहे पाहण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत चांगले चित्रपट चित्रपटगृहात येणारच नाह़ी त्यामुळे चांगल्या चित्रपटाअभावी पेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली असल्याची चित्रगृहाची मालकांनी दिली आहे.
कोविडचा प्रकोप कमी हायला लागल्यानंतर शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणत चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली. चित्रपटगृहे सुरु होऊन जवळपास दोन आठवडे लोटले तरीही चित्रपटगृहांमध्ये शुकशुकाट कायम आहे . नवीन चित्रपट आले नाहीत , त्यामुळे प्रेक्षकही चित्रपटगृहाकडे फिरकत नसल्याने चित्रपटगृहातील क्रिन तब्बल साडेनऊ महिन्यांपासून पांढरीच आहे. लॉकडाऊनकाळात अनेकांना फटका सहन करावा लागला. राज्यातील सिंगल, डबल क्रिन चित्रपटगृहे या काळात बंद करण्यात आले. शिथिलतेनंतर उद्योग व्यवसायांची गाडी हळूहळू रुळावर यायला लागली आहे. मात्र चित्रपटगृहे शिथिलतेनंतरही लॉकडाऊनच असल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर दोन आठवड्यापर्यंत चित्रपटगृहे सुरुही केले पण, नवीन चित्रपट नसल्याने प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटांच्या शो दरम्यान 90 टक्के खुर्च्या रिकाम्या राहत असल्याचे निदर्शनास आल्यावर चित्रपटगृह बंद करण्यात आले. आजही शहरातील तीनही चित्रपटगृह बंद असल्याने मालकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने त्याचा सबंधित व्यवसायांवरही परिणाम झाला असून खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.