वार्ताहर / जैतापुर
राजापूर तालुक्यातील दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे परिसरात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत काम करणाऱ्या तीन नेपाळी कामगारांचा रविवारी रात्री अकस्मात मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी तब्बेतीत बिघाड झाल्याने त्यांना धारतले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, नंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिविल येथे नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, यांच्यासह लांज्याचे डीवायएसपी श्रीनिवास साळुंखे राजापुरचे पोलीस निरीक्षक परबकर,नाटे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस