प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या राधाकृष्णनगर येथे शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भगार गोडावूनला भीषण आग लागल़ी नगरपरिषदेच्या बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आल़ी या आगीमध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असले तरीही सुदैवाने कोणीही जखमी झाले नाह़ी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राधाकृष्णनगर येथे रहिवासी भागात असलेल्या गोडावूनला आग लागल्याने एकच गोंधळ उडाल़ा आगीचे लोळ जोराने पसरू लागल्यामुळे नजीकच्या इमारतीं व घरांना धोका निर्माण झाला होत़ा आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचे बंब घटनास्थळी दाखल झाल़े आगीचे स्वरूप भयावह झाल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांना मोठी कसरत करावी लागल़ी 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आल़े
आगीमध्ये गोडावूनमधील भंगाराचे सामान खाक झाले आह़े सुदैवाने आगीमध्ये कुणीही जखमी झाले नाह़ी आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाह़ी या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरु आह़े