वार्ताहर / मौजे दापोली
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकणाऱ्या चक्रीवादळामुळे दापोली तालुक्यातील समुद्रालगत असणाऱ्या गावांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वादळ समुद्राकडून येत असल्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना देखील सावध रहाण्याची सूचना हवामान विभागाने दिलेल्या आहेत. हे वादळ किनारपट्टीला पुन्हा आपल्या ताब्यात तर घेणार नाही ना ? अशी भिती अनेकांनी व्यक्त केली.
3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली तालुक्यातील समुद्रालगत असणाऱ्या ग्रामीण भागांमध्ये होत्याचे नव्हते झाले होते.
त्यात कोरोनाचे संकट अशी परिस्थिती असताना पुन्हा अरबी समुद्रातील वादळाच्या सूचना हवामान विभागाने दिल्यामुळे हे वादळ आता काय समस्या निर्माण करेल याकडे अनेकांचे लक्ष आहे. हे वादळ समुद्रामार्गाने दापोलीकडे येईल का की अन्य कुठे फिरेल असा प्रश्न आहेत. परंतु जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीदळातून अजून दापोलीतील जनता सावरली नसताना पुन्हा वादळाची सूचना देण्यात आल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता भयभीत झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.