प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोनाच्या संक्रमणाला केवळ व्यवसायिकच जबाबदार आहेत असा समज करून सर्व नियमावली काढण्यात येते असा आरोप व्यवसायिक करत आहेत. कोरोना संक्रमण सुरु झाल्यापसून हॉटेल व्यवसाय बंद असल्याने हे सर्वजण भिकेकंगाल झाले आहेत. शासनाने आजवर या वर्गावर दुर्लक्ष केल्याचा आरोप रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायिक अभिषेक सुर्वे यांनी केला आहे. ते म्हणतात कि आम्ही देखील खाण्याचे म्हणजेच जीवनावश्यक पदार्थच विकतो.
रुग्णांना, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आम्ही खाद्य पुरवतो. रस्त्यांवर गर्दी आहे. पण हॉटेलमध्ये चार ग्राहक बसले तर कोरोना होणार यामागे सरकारचे लॉजिक काय आहे ? आमच्या डिलिव्हरी बॉयना देखील त्रास दिला जातो. हॉटेल चालू करायची परवानगी सरकार देत नाही, निदान आत्महत्या करायची तरी परवानगी द्या अशा मागणीचा फलक आपल्या बंद हॉटेलपुढे झळकावत हॉटेल व्यवसायिक अभिषेक सुर्वे यांनी आपली व्यथा मांडली आहे.