गोल्ड कोस्ट : यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला संघातील गुरूवारी खेळविण्यात आलेला पहिला टी-20 सामना मुसळधार पावसामुळे रद्द करावा लागला. रद्द झालेल्या या सामन्यात भारताची जेमिमा रॉड्रीग्जने शानदार नाबाद 49 धावा जमविल्या. भारताने या सामन्यात दमदार सुरूवात करताना 15.2 षटकांत 4 बाद 131 धावा फटकावल्या होत्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघातील शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीने आक्रमक सुरूवात केली. शफाली वर्माने ऑस्ट्रेलियाच्या व्हॅलेमेनिकच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला.
संक्षिप्त धावफलक : भारत 15.2 षटकांत 4 बाद 131 (जेमिमा रॉड्रिग्ज 36 चेंडूत नाबाद 49, घोष 13 चेंडूत नाबाद 17, स्मृती 10 चेंडूत 17, शफाली वर्मा 14 चेंडूत 18, हरमनप्रित कौर 5 चेंडूत 12, भाटिया 15, अवांतर 3, गार्डनर 2-28, मॉलीन 1-23, वेअरहॅम 1-3).