कागदपत्रे जमा करणे झाले आहे कठीण : ग्राम पंचायत निवडणूक असल्यामुळे शेतकऱयांनी विमा भरण्याकडे पाठ
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. पण म्हणावा तसा शेतकऱयांचा प्रतिसाद या विमा योजनेला मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तरी देखील आता जिल्हा प्रशासनाने जनजागृती केली आहे. त्यामुळे शेतकरी शेतीचा उतारा काढून पीक विमा भरण्यासाठी धडपड करू लागले आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शेतकऱयांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. यातच ग्राम पंचायत निवडणूक असल्यामुळे शेतकऱयांनी विमा भरण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
रब्बी पिकांमध्ये केवळ काही पिकांसाठीच नुकसानभरपाई देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. यामुळे अनेक शेतकऱयांची अडचण झाली आहे. यामध्ये केवळ जोंधळा, गहू, मसूर, हरभरा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे बटाटा, पालेभाजी आणि इतर पिके घेणाऱया शेतकऱयांची कोंडी होऊ लागली आहे. त्यांना कोणतीच नुकसानभरपाई मिळेनासी झाली आहे. सर्वात अधिक फटका हा बटाटा आणि कोबी पिकाला बसत आहे. किमान या दोन्ही पिकांचा पीक विमा योजनेत समावेश करणे गरजेचे आहे. बटाटा पीक घ्यायचे असेल तर शेतकऱयांना मोठी गुंतवणूक करावी लागते. यावषी खरीप हंगामातही बटाटा पिकाला फटका बसला आहे. आता उन्हाळी बटाटा लागवड करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. मात्र, त्याला विमा नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहे.
बेळगाव तालुक्मयासाठी पीक विमा कुचकामी ठरण्याची शक्मयता
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाच्या लहरीपणाचा फटका सहन केल्याशिवाय दुसरा पर्यायच शेतकऱयांसमोर उपलब्ध नाही. काही ठिकाणी शेतकरी कूपनलिका व विहिरींची खोदाई करून पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यातच वीज समस्या नेहमीच भेडसावत असते. तालुक्मयामध्ये भात, बटाटा, गाजर, मुळा, भाजीपाला व कडधान्य तसेच इतर काही पिके शेतकरी घेत असतात. हरभरा, जोंधळा, मसूर, गहू ही पिके घेणारे तालुक्मयात शेतकरी कमीच आहेत. त्यामुळे पीक विमा योजना बेळगाव तालुक्मयासाठी तरी कुचकामी ठरण्याची शक्मयता व्यक्त होऊ लागली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना रब्बी पिकासाठीही लागू आहे. शेतकऱयांना या विमा योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी जनजागृती करा आणि अधिकाधिक शेतकऱयांचा विमा जमा करा, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कृषी अधिकारी व इतर अधिकाऱयांना सांगितले होते. त्यानुसार आता प्रत्येक गावांमधील शेतकऱयांमध्ये जनजागृती केली जात आहे. पीक विम्याचे महत्त्व शेतकऱयांना पटवून दिले जावू लागले आहे. यामुळे अनेक शेतकरी पीक विमा भरण्यास पुढे सरसावत असले तरी कागदपत्रांची पूर्तता करताना समस्या निर्माण होत आहेत.
शेतकऱयांनी पीक विमा भरण्यास पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण दूषित हवामान आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे दरवषीच फटका बसू लागला आहे. यामुळे काही शेतकरीही आता विमा भरण्यासाठी पुढे येत आहेत. पण त्यांना आता वेगळय़ाच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विमा भरण्यासाठी सात-बारा उतारा आवश्यक आहे. पण सर्व्हर डाऊनमुळे उताऱयासाठी झुंबड उडत आहे. शेतकऱयांनी खरीप पिकासाठी विमा भरण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता रब्बी पिकामध्ये काही मोजक्मयाच पिकांना ही विमा योजना लागू आहे. जिल्हाधिकाऱयांनी याबाबत बैठक घेऊन विमा कंपनी व बँकेच्या अधिकाऱयांनाही यासाठी सहकार्य करा, अशी सूचना केली आहे.
विम्यातून ऊस पीक वगळल्याने नाराजी
सध्या तालुक्मयात विविध गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण होत आहे. सध्या काही गावांमध्ये जनजागृती व विमा योजनेसंदर्भात माहिती करून देण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या पीक विमा योजनेत ऊस पीक घेण्यात आले नाही. बेळगाव जिह्यात 25 हून अधिक साखर कारखाने आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱयांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पीक विमा योजनेला थंडा प्रतिसाद
पीक विमा योजनेसाठी शेतकऱयांनी उतारा, रेशनकार्ड व आधार कार्ड देणे बंधनकारक आहे. सध्या तालुक्मयात विविध भागात पीक विमा योजना राबविण्यासाठी अनेक अधिकाऱयांना जुंपण्यात आले असले तरी, शेतकऱयांनी पुढाकार घेतल्याशिवाय ही योजना सफल होणार नसल्याचे अधिकाऱयांतून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.