शेतकऱयांचा संतप्त सवाल : कृषी खात्याचे दुर्लक्ष, अनावश्यक बि-बियाणे उपलब्ध, हवामानाचा फटका
प्रतिनिधी /बेळगाव
कृषी खात्याकडून खरीप आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱयांना बि-बियाणे दिली जातात. मात्र ती शेतकऱयांपर्यंत पोहोचतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱयांना आवश्यक बि-बियाणांसाठी खासगी दुकानदारांवरच अवलंबून रहावे लागत आहे. मागील कित्येक वर्षापासून हीच परिस्थिती असल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात तरी आवश्यक बि-बियाणे उपलब्ध होतील का? असा प्रश्न शेतकऱयांतून उपस्थित होत आहे.
कृषी खाते, रयत संपर्क केंदे आणि कृषी पत्तीन संघामार्फत दरवषी अनावश्यक बि-बियाणांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱयांना आवश्यक बि-बियाणे अधिक पैसे मोजुन खासगी दुकानांमधून विकत आणावी लागतात. ऐन हंगामात शेतकऱयांची बि-बियाणे आणि खतांची जमवाजमव करण्यासाठी धडपड सुरू होते. मात्र कृषी खात्याकडून आवश्यक बि-बियाणे उपलब्ध होत नसल्याने मिळेल ती बियाणे घेऊन हंगाम साधावा लागतो.
तालुक्मयातील उचगाव, काकती, हिरेबागेवाडी, बेळगाव आदी ठिकाणी रयत संपर्क केंदे सुरू करण्यात आली आहेत. मात्र या ठिकाणी अनावश्यक बि-बियाणांचा भरणा अधिक आहे. शेतकऱयांना आवश्यक नसलेल्या बि-बियाणांचा भरणा अधिक केला जात असल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा देखील होताना दिसत आहे. तसेच नंदीहळ्ळी, बेळगुंदी, मारिहाळ, मुत्नाळ, मोदगा, हलगा, के. के. कोप्प, बडाल अंकलगी आदी ठिकाणी कृषी पत्तीन संघ आहेत. मात्र या ठिकाणी देखील शेतकऱयांना आवश्यक बि-बियाणे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱयांना ती खासगी दुकानातूनच विकत घ्यावी लागत
आहेत.
कृषी खात्याकडून दरवर्षी शेतीव्यवसाय संबंधी विविध योजनांच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात शेतकरी या योजनांपासून दूर राहतात. शिवाय या योजना शेतकऱयांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नाही. त्यामुळे कृषीसंबंधी असलेल्या योजनांपासून शेतकरी चार हात दूर असलेले पहायला मिळतात. कृषी खाते खरीप आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर पेरणीचे उद्दीष्ट ठेवते. मात्र शेतकऱयांना आवश्यक बि-बियाणे मिळतात की नाही याकडे मात्र दुर्लक्ष करते. त्यामुळे शेतकऱयांना आवश्यक बि-बियाणांपासून दूर रहावे लागत आहे.
मागील काही वर्षात अतिवृष्टी, महागाई आणि बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱयांना बसत आहे. त्यातच कृषी खात्याकडून मिळणाऱया योजनांपासून देखील शेतकरी वंचित असल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे येत्या रब्बी हंगामात शेतकऱयांना वेळेत व आवश्यक बि-बियाणांचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
आर. बी. नायकर (तालुका सहाय्यक कृषी निर्देशक)
रब्बी हंगामात शेतकरी आपल्या घरात साठवणूक केलेल्या बि-बियाणांची पेरणी करतात. त्यामुळे शासनाकडून रब्बी हंगामात आवश्यक बि-बियाणांची गरज भासत नाही. तसेच युरिया देखील अधिक प्रमाणात लागत नाहीत. मात्र कॉम्प्लेक्स खताचा रब्बी हंगामासाठी आवश्यक पुरवठा करण्यात आला आहे.
मल्लाप्पा बेळगावकर (शेतकरी, अतिवाड)
रयत संपर्क केंद्रातून खरीप आणि रब्बी हंगामात आवश्यक बि-बियाणे मिळत नाहीत. त्यामुळे रयत संपर्क केंद्राकडे जाऊन माघारी परतावे लागते. हंगाम वेळेत साधण्यासाठी खासगी दुकानदारांकडून अधिक पैसे देऊन बि-बियाणे खरेदी करावी लागतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसत आहे. कृषी खात्याने शेतकऱयांना लागणारी बि-बियाणे आणि रासायनिक खते उपलब्ध करावीत.