अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 19 जुलै 2021, सकाळी 11.00
● रविवारी अहवालात 570 बाधित ● एकूण 9,694 जणांची तपासणी ● पॉझिटिव्हिटी दर 5.88 टक्के ● जिल्ह्यात 2,915 बेड रिक्त ● सामाजिक परिणाम विचारात घ्या
सातारा / प्रतिनिधी :
मुंबईसारख्या ठिकाणी बाधितांची संख्या चारशे तर साताऱ्यात आठशेच्या पट्टीत वाढ सुरु आहे. मृत्यूदरही घटत नसल्याने आणि बाधित वाढ थांबत नसल्याने जिल्ह्यातील वातावरण पॅनिकच आहे. मात्र, दर रविवारी जिल्ह्यात बाधित वाढीचा आलेख खाली घसरतो आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटीचा दर देखील तेवढ्याच प्रमाणात खाली घसरल्याचा किंचित दिलासा मिळतो.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 5.88 टक्के
दरम्यान, रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 570 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यात 9,694 जणांच्या तपासण्या झालेले आहेत. यामध्ये दर रविवारचा नेहमीप्रमाणेचा पॉझिटिव्हिटीचा दर खाली घसरला असून तो 588 एवढा आहे आरटीपीसीआर टेस्टिंगचा पॉझिटिव्हिटी दर किती आहे हे अहवालात नमूद करण्यात आलेली नाही फक्त किती तपासण्या झाल्या व किती बाधित आले एवढाच उल्लेख आहे.
सामाजिक परिणाम विचारात घ्या
गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण जगभरात सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या आतापर्यंतच्या एकूण अनुभवानंतर देखील कोणालाही ठोस उपाय राहुल नाही त्यावरचा एकच ठोस उपाय प्रशासनाकडे आहे तो म्हणजे लॉकडाऊन. तरी देखील लोक कोरोना मुक्त होत आहेत हे बहुदा मेडिकल सायन्सचा चमत्कारच म्हणावा लागेल. ज्यांचा मृत्यू होत आहे त्यांच्या बाबतीत हा चमत्कार कदाचित होत नसावा एवढेच. त्यावर करण्यात येणारा जालीम उपाय म्हणजे लॉकडाउन. मात्र त्याचे विविध सामाजिक आर्थिक परिणाम झालेले आहेत त्याकडे गांभीर्याने पहावे लागेल हा संदेश परिस्थिती देत आहे.
माणसांना इतर देखील आजार असतात
सध्या कोरोना संसर्ग सुरू असला तरी माणसांना इतर देखील आजार असू शकतात व त्यावर पहिल्यांदा उपचारांची गरज असते. मात्र पहिल्यांदा गेले की हॉस्पिटल मध्ये कोरोनाची टेस्ट आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. याचे काही गंभीर परिणाम समोर येत आहेत. म्हणजे एखाद्याला हार्ट अटॅक आला असेल तर त्याची पहिल्यांदा कोरोना टेस्ट करत असाल तोपर्यंत त्या रुग्णाची अवस्था काय होत असेल याचा विचार मेडिकल क्षेत्रातील तज्ञांनी करायला हवा. असेच एक दोन तीन प्रकार समोर आलेले आहेत. यामध्ये त्या नागरिकांना जीव गमवावा लागण्याची वेळ आलेली आहे.
कराड, सातारा मध्ये नेमकं काय
महाबळेश्वर तालुक्यातील बाधित वाढीचा वेग मोठया प्रमाणात खाली घसरला आहे. तर इतर वाई, फलटण, जावली, पाटण, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा तालुके चांगलेच सावरले आहेत. या तालुक्यातील वाढ दोन अंकावर आली असून यामध्ये महाबळेश्वर तालुक्याला चांगला दिलासा लाभला आहे. विषय राहिला आहे तो फक्त सातारा व कराड तालुक्यांचा. कराडमध्ये पुन्हा कोरोनाने हाहाकार सुरु केला असून यातून सावरण्यासाठी या दोन्ही तालुक्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. महाबळेश्वरवाशीयांनी लॉक डॉऊन शिथील करावा करावा, अशी मागणी तीन दिवसांपूर्वीच केलेले आहे मात्र त्यांचा राहू दे, जिल्ह्याच्या लॉकडाऊन बाबत प्रशासन निर्णय घेऊ शकलेले नाही.
जिल्हय़ात 2,915 बेड रिक्त
जिल्हयात विविध कोव्हिड हॉस्पिटलमध्ये 4 हजार 823 बेड असून यामध्ये 1 हजार 908 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. त्यामुळे 2 हजार 915 बेड रिक्त असून यामध्ये 1,993 ऑक्सिजन बेड रिक्त असल्याचा दिलासा आहे. आयसीयू व्हेंटीलेटर बेड 108, आयसीयू व्हेंटीलेटरविना बेड 243 तर ऑक्सिजन विना 571 एवढे असे 2,915 बेड जिल्हय़ात रिक्त असल्याने बेडसाठी होणारी पळापळ थांबली आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 12,62,597, एकूण बाधित 2,08,591, घरी सोडण्यात आलेले 1,95,629, मृत्यू 5,043, उपचारार्थ रुग्ण 9,813
रविवारी जिल्हय़ात बाधित 821, मुक्त 555, बळी 29