दुपारपर्यंत शहर परिसरात ऊन : खरेदी करण्यासाठी नागरिक पडले बाहेर
प्रतिनिधी / बेळगाव
मागील आठवडाभरापासून बेळगाव जिल्हय़ात धुवाधार पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांना पाणी आले. शहरामध्येही सखल भागात पाणी भरले. आठवडाभर पडलेल्या संततधारेमुळे नागरिक हैराण झाले होते. परंतु रविवारी मात्र सकाळपासून पावसाने उघडीप दिली. दुपारपर्यंत शहर परिसरात ऊन होते. त्यामुळे नागरिकांनी काहीसा उसासा
टाकला.
कोकण किनारपट्टीसह बेळगाव जिल्हय़ात आठवडाभरापासून दमदार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने जिल्हय़ात दाणादाण उडवून दिली. नद्यांना पाणी आल्याने काही संपर्क रस्ते पाण्याखाली गेले. नदी-नालेही दुथडी भरून वाहत होते. बेळगाव शहराच्या बाजूने जाणाऱया बळ्ळारी नाल्याला पुराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे शेकडो एकर शेतजमीन पाच-सहा दिवसांपासून पाण्याखाली आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस कधी कमी होणार याची चिंता प्रत्येकालाच लागली होती.
आठ दिवसांपासून पावसामुळे पाणी साचून
रविवारी सकाळपासून शहर व तालुक्मयात पावसाचे प्रमाण अत्यल्प दिसून आले. काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. दहा वाजल्यानंतर कडक ऊन पडल्याने शेतकऱयांनी शेतामध्ये जावून पाणी काढण्यास सुरुवात केली. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साचून होते. हे साचलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱयांमधून केला जात होता.
पावसाने रविवारी थोडीशी उसंत घेतल्याने शहरात लॉकडाऊन असतानाही तुरळक रहदारी दिसत होती. भाजीपाला, दूध, फळे, औषध गोळय़ा खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडले होते. आठ दिवसांनंतर कडक ऊन पडल्याने धान्य व इतर साहित्य सुकविण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू होती. सोमवारपासून बेळगाव जिल्हय़ात अनलॉक होणार असल्याने काही जण त्याची तयारी करताना दिसून आले. दुकानांची स्वच्छता करताना कामगार दिसत होते.