ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आदेश
प्रतिनिधी/ बेळगाव
22 डिसेंबर रोजी ग्राम पंचयतांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमिवर रविवार दि. 20 डिसेंबरच्या सायंकाळी 5 पासून मंगळवार दि. 22 डिसेंबरच्या सायंकाळी 5 पर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश पहिल्या टप्प्यातील मतदान होणाऱया तालुक्मयांसाठी असणार आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शनिवारी सायंकाळी जमावबंदीचा आदेश बजावला आहे. दुसऱया टप्प्यासाठी 27 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी येत्या शुक्रवार दि. 25 डिसेंबरच्या सायंकाळी 5 पासून 27 डिसेंबरच्या सायंकाळी 7 पर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात येणार आहे.
रविवारी सायंकाळपासून हा आदेश जारी होणार आहे. ग्राम पंचायतीच्या निवडणुका जेथे होणार आहेत त्या गावात पाचहून अधिक जणांनी एकत्र फिरु नये. सभा किंवा मिरवणूका घेवू नये, उमेदवार व त्यांच्या समर्थकांना घरोघरी भेटी देवून प्रचार करता येणार आहे. मात्र त्यांची संख्या पाचहून अधिक असू नये, असे जिल्हाधिकाऱयांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
जे ग्राम पंचायतीसाठी मतदार नाहीत त्यांनी मतदार संघाबाहेर जावे. शस्त्रs, लाठय़ा, भाले, तलवार, गदा, बंदूक, चाकू आदी इतर घातक शस्त्रs घेवून फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. दगड व स्फोटके साठविण्यावरही बंदी आहे. या काळात प्रतिकृतींचे दहन करणे किंवा प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यावर बंदी असणार आहे.
निवडणुकीच्या काळात वाद्य वाजविणे, घोषणा देणे, गाणे म्हणण्यावरही बंदी असून प्रक्षोभक गाणी किंवा घोषणा देवू नये. सभ्यतेला व नैतिकतेला धक्का पोहोचविणाऱया कृती व कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीला सुरुंग लावणाऱया कृती कोणी करु नये, असे आवाहन करतानाच हा आदेश अंत्ययात्रा, लग्न, धार्मिक मिरवणुकांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकाऱयांनी कळविले आहे.