ऑनलाईन टीम / तरुण भारत
इंधनाच्या मुद्यावरुन भारताने पश्चिमेकडील देशांना खडे बोल सुनावले असुन, भारत हा इंधनासाठी बहुतांशी आयातीवर अवलंबुन असल्याने भारताच्या इंधन आयातीवरुन कोणत्या ही देशाने राजकारण करु नये. असे ही भारताने ठणकावले आहे. यातच आता भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांनी रशियन बाजारपेठ सोडणाऱ्या पाश्चात्य उत्पादकांची जागा घेऊ शकतात असे स्पष्ट करत नवनियुक्त रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी रोसिया 24 ब्रॉडकास्टरला सांगितले की, भारत एक “वर्ल्ड फार्मसी”आहे आणि जेनेरिक औषधांचा अग्रगण्य उत्पादक आहे, जे मूळ औषधांपेक्षा निकृष्ट नाहीत.
स्पुतनिक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने अलीपोव्ह यांनी सांगिते की, “रशियन बाजारातून अनेक पाश्चिमात्य कंपन्यांनी माघार घेतल्याने आणि ज्या जागा रिकाम्या झाल्या आहेत, तिथे खरे तर अनेक उद्योगांमध्ये विशेष करून फार्मास्यूटिकल्समध्ये भारतीय कंपन्या ताबा मिळवू शकतात.”
युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल पाश्चिमात्य देश रशियावर कठोर निर्बंध लादत असल्याने, सध्या सुरू असलेल्या संघर्षात बाजू निवडण्यासाठी भारतावर प्रचंड दबाव आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे पालन करण्याच्या गरजेवर भर देत रशियाच्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघातील ठरावांवर मतदान करण्यापासून भारताने स्वत:ला ठेवले आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.