प्रतिनिधी /पणजी
वाहतूक नियमभंग करणाऱयांना 100 पटीने अधिक दंड देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने कायदा दुरुस्ती करुन केली पण त्याची अंमलबजावणी करण्याची मुभा राज्य सरकारवर सोपविली. गोवा वगळता इतर अनेक राज्यांनी हा नवा कायदा यापूर्वीच लागू केला असून गोव्यात तो 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे. सदर कायदा दुरुस्ती होताच सर्वप्रथम दिल्ली सरकारने त्याची अंमलबजावणी केली.
जो दंड 100 रुपये होता तो आता 500 होणार आहे. वाहन चालन परवाना नसल्यास 450 रुपये दंड होता तो आता 5000 रुपये होणार आहे. अल्पवयीन वाहन चालवताना पकडल्यास त्याला 500 ऐवजी त्याला वाहन देणाऱया वाहन मालकास पाच हजार, भरधाव वाहन चालवणाऱयाला 300 ऐवजी 1 हजार, वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास 600 ऐवजी 1 हजार रु., सीट बेल्ट न वापरल्यास 100 ऐवजी 1 हजार रु. हेल्मेट न वापरणाऱयांना 100 ऐवजी 1 हजार रु., वाहनाचा वीमा नसल्यास 500 ऐवजी 2 हजार रु. दंड देण्यात येणार आहे. दि. 1 एप्रिल 2022 पासून नवीन कायद्यानुसार दंड आकारण्यात येणार आहे.