लुईझिनच्या होमग्राऊंडवर शक्ती प्रदर्शन
प्रतिनिधी /मडगाव
गोवा राज्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि दरवाढीच्या विरोधात दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीने निषेध रॅली काढण्यात आली आणि प्रतिकात्मक स्वरुपात नावेली बगल जंक्शन येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. नावेलीत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नावेली मतदारसंघात काँग्रेस पक्षासमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यांच्याच होमग्राऊंडवर काँग्रेसने शक्ती प्रदर्शन घडवून आणले.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या उदासीनतेमुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकारकडे अनेक तक्रारी करूनही सरकारने कोणतीही कार्यवाही न झाल्याने काँग्रेस पक्षाने जनतेच्या वतीने हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेला कंटाळलेल्या गोव्यातील जनतेने या आंदोलनाला चांगलीच हजेरी लावली होती.
दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष जोसेफ डायस यांनी नावेली बगल रस्त्याची दुरूस्ती आणि हॉटमिक्स डांबरीकरण 15 दिवसांत युद्धपातळीवर करण्याची मुदत दिली आहे. जर दिलेल्या मुदतीत रस्त्याची दुरूस्ती आणि हॉटमिक्स डांबरीकरण न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग 66 वर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याच रस्त्यावर कार्यालय असलेल्या ‘आप’ला दैनंदिन प्रवाशांचे हाल पाहण्यात अपयश आल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
पक्षाचे कार्याध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप केला. गरीब जनतेसाठी सरकारचे कोणतेच धोरण नाही. अर्थव्यवस्था चुकीच्या पद्धतीने हाताळणीमुळे गरीब जनता त्रस्त झाली आहे. सरकारने गरीब लोकांच्या दुर्दशेकडे कान-डोळा केला आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, नुकत्याच झालेल्या विधानसभेत त्यांनी सरकारला मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते दुरुस्त करण्याची सूचना केली. कारण, राज्यातील सर्व रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ज्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. प्रमोद सावंत यांनी त्याला होकार दिला होता. मात्र, गरीब दैनंदिन प्रवाशांचे हाल दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात ते अपयशी ठरले आहे.
गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना भाजप सत्तेच्या नशेत असून सर्वसामान्यांचे दुःख पाहण्यात अपयशी ठरले आहे, त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर सर्वसामान्यांचे दुःख कमी करण्यासाठी कोणतीही कृती योजना नाही अशी टीका केली.
प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक, सुभाष फळदेसाई, विठोबा देसाई, विजय भिके, नावेली गट काँग्रेसचे अध्यक्ष पीटर कुतिन्हो, सबिता मास्कारेन्हास यांनी आपले विचार मांडले. रस्त्यांची स्थिती आणि दरवाढ आणि परिणामी देशातील महागाई याविषयी त्यांची मते. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यांनी या आंदोलनात मोठय़ा संख्येने उपस्थित राहिलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानले आणि सरकारच्या उदासीन दृष्टीकोनामुळे त्याच ठिकाणी आणखी एका मोठय़ा प्रमाणावर आंदोलनासाठी सज्ज होण्यास सांगितले.