वार्ताहर / वाठार किरोली
कोरोना माहामारीच्या कालावधीत बंद झालेला आठवडी बाजार गुरुवार दिनांक ३१ शासनाच्या नियमांचे पालन करून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती नगराध्यक्ष श्री. आनंदा कोरे व उपनगराध्यक्ष सौं. सुरेखा माने यांनी दिली. भाजी विक्रेते , शेतकरी , व्यापारी यांनी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत आठवडा बाजारात व्यवहार करण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यावर रहिमतपुर पालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
भाजी मंडई परिसरात व्यापारी विक्रेते व्यावसायिक यांनी आप आपसामध्ये समन्वयाची भुमिका घेऊन उपलब्ध होणाऱ्या समस्या सोडवाव्यात. असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष श्री. सुनिल माने विरोधी पक्ष नेते श्री.निलेश माने मुख्याधिकारी संजीवनी दळवी सर्व नगरसेवक , भाजी विक्रेते , व्यापारी उपस्थित होते.