प्रतिनिधी/ बेळगाव
उन्हाची चाहूल लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार का? अशी धास्ती शहरवासियांना लागली आहे. मात्र शहरवासियांची तहान भागविणाऱया राकसकोप जलाशयाची पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत सहा फुटाने जास्त आहे. आणखीन 33 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता करण्याची गरज नाही.
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी राकसकोप जलाशयावर अवलंबून रहावे लागते. मागील वर्षी पाणी समस्या निर्माण झाल्याने डेडस्टोरेजमधील पाणी साठा उपसा करून पाणी पुरवठा करून शहरवासियांची तहान भागविण्यात आली. तसेच पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने नोव्हेबरपर्यत जलाशयामधील पाणी ओव्हरल्फो होते. तसेच डिसेंबर अखेरपर्यत पाऊस सुरू होता. त्यामुळे जलाशयाची पाणी पातळी टिकून आहे. तसेच पाणी समस्या निर्माण होवू नये याकरिता पाणी पुरवठा मंडळाने आवश्यक खबरदारी घेवून वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या. दरवषी मार्च महिन्यापासून पाणी कपात करून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. तसेच मे अखेर आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येते. मात्र यंदा आतापर्यत तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मे महिन्याच्या मध्यावर आलो तरी अद्याप पाणी कपात करण्यात आली नसल्याने पाणी टंचाई भासणार का? अशी चिंता शहरवासियांना लागली आहे. पण मागील वर्षी झालेल्या पावसामुळे शहरवासियांची चिंता कमी झाली आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे सध्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी 2457 फुट 4 इंच आहे. तर मागील वर्षी 2451 फुट 8 इंच होती. मागील वषीच्या तुलनेत सहा फुटाने पाणी साठा जास्त आहे. यामुळे आणखीन 33 दिवस पुरेल इतका पाणी साठा जलाशयामध्ये शिल्लक आहे.
मागील वर्षी वेळेवर पाऊस झाला नसल्याने जलाशयामधील पाणीसाठा कमी झाला. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी डेडस्टोरेजमधील पाण्याचा उपसा करण्यात आला होता. पण सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा नियोजनानुसार आणखीन 33 दिवस पुरेल इतका पाणी साठा आहे. जर महिन्याभरात पाऊस न झाल्यास डेडस्टोरेजमधील पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्मयता आहे. डेडस्टोरजमधील पाणीसाठा दहा दिवस पुरवठा करता येणे शक्मय आहे. त्यामुळे शहरवासियांना दिड महिना पुरेल इतके पाणी जलाशयामध्ये शिल्लक आहे.