विजयश्री खेचून आणण्यात सामान्य कार्यकर्त्याचा महत्वाचा वाटा
वार्ताहर /माशेल
प्रियोळ मतदारसंघातून सलग दुसऱयांदा बाजी मारून भाजपाचे उमेदवार गोविंद गावडे यांनी इतिहासाची पुनरावृत्ती केलेली आहे. डॉ काशिनाथ जल्मी यांच्यानंतर प्रियोळ मतदारसंघात सलग दुसऱयांदा निवडणूक जिंकण्याची किमया गावडे यांनी साधलेली अ ाहे. प्रियोळ मतदारसंघातील स्वाभिमानी कार्यकर्त्यामुळेच हे साध्य झाल्याची प्रतिक्रीया माजी मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की विरोधक आपल्याला खाली खेचण्यासाठी एकसंघ झाले होते. आपले कार्यकर्ते फोडण्य़ाचे राजकारण केले होते. तरीही देवाच्या कृपेने व सामान्य कार्यकर्त्यानी आपण मतदारसंघात केलेल्या विकासकामांची जोरावर अपाल्याला कौल दिल्याचे सांगितले. गेली पाच वर्षे प्रियोळ मतदार सातत्याने केलेल्या विकासकामांची पावती कार्यकर्त्यानी दिलेल्या सर्व कार्यकत्याचे आभार क्यक्त केले. निस्वार्थी कयकर्तेच्यासह ज्या युवकांना अजून मतदानाचा हक्क लाभलेला नाही त्यांनी आपल्या पालकांना गोविंद गावडे याना मतदान करण्याचे आवाहन केल्याचेही नमूद केलेले आहे. आपल्याला राजकरणतून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणाऱयासाठी एकजूट झालेल्या विरोधकांना ही जबरदस्त चपराक असल्याचे सांगताना ‘जो जिता वही सिकंदर’ ठरत असल्याचे ते म्हणाले.