प्रतिनिधी/ सातारा
नुकतीच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेत कधी नव्हे ती पारदर्शक बदली प्रक्रिया होऊन ही भ्रष्टाचाराच्या आरोपाने गाजली होती. वास्तविक जे बारा शिक्षक बदली झाली ते फलटण तालुक्यातील होते तर आरोप करणारे आमदार जयकुमार गोरे हे माण तालुक्यातील आहे. यावरून सभापती रामराजे विरुद्ध जयकुमार गोरे असे जून राजकारण पेटले आहे. यामध्ये विनाकारण जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग भरडला जातो आहे. आमदार गोरे यांच्या आरोपाला प्रतिआव्हान शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दिले आहे. भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवा शिक्षक बदली प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांनी रँडम राउंडच्या गोंडस नावाखाली सोयीनुसार लाभ देण्याचा घाट घातला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यावर्षी अतिशय पारदर्शक अशा बदली प्रक्रिया राबवली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी सर्व संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यावतीने सभेपुर्वी त्या संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले. दि.27 फेब्रुवारी 2017 च्या आदेशानुसार पारदर्शक बदली प्रक्रिया राबवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सीसीटीव्हीच्या कक्षेत घेतली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत व त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्या आरोपाचे खंडन जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी करून आमदार गोरे यांनाच प्रतिआव्हान दिले. भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवाच, पारदर्शक बदली प्रक्रिया झाली आहे. मुळात शिक्षक बदलीवरून राजकारण पेटण्याचे कारण म्हणजे बदली प्रक्रियेत जे 12 शिक्षक होते त्यात फलटण तालुक्यातील 9 अन खटावचे 3 होते.
फलटण म्हणले की विधान परिषदेचे सभापती रामराजे आणि रामराजेंचे राजकीय शत्रू हे आमदार जयकुमार गोरे आहेत. पाठीमागे ही आमदार गोरे यांनी असेच कृषी विभागाचे अधीक्षक जितेंद्र शिंदे यांच्याबाबतीत आरोप केले होते. त्यांची बदली झाली मात्र, शिंदे हे ही फलटणचे होते. आता ही तसाच काहीसा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. सभापती रामराजे आणि आमदार जयकुमार गोरे यांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. दरम्यान, न्यायालयीन आदेश पाळला जिल्हा परिषदेने पाळला आहे. आमदार गोरे यांनी विनाकारण आपलं जून वैर काढल्याने त्यांच्या राजकारणात विनाकारण शिक्षक व शिक्षण विभाग भरडला जात आहे, अशी ही चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांनी न्यायालयीन लढा लढणाऱया शिक्षकांना न्याय देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती.
रँडम राउंडचा लाभ किती वेळा
तत्कालीन पारदर्शक बदली प्रक्रिया राबवण्यासाठी काढण्यात आलेला जीआर पाहिला तर त्यावर्षी पुरता होता. परंतु सोयीनुसार अर्थ काढून दरवर्षी रँडम राउंडचे राजकारण सुरू झाले. आता ही जिह्यातील शिक्षक संघटनांनी निवेदने दिली आहेत. परंतु या कोरोनाच्या काळात शिक्षकांना दोन दिवस आपल्या शाळेवर जाण्याचे आदेश आहेत. ठराविक शिक्षक जे प्रामाणिक काम करतात ते शिक्षक सोडून शाळेवर असतात का याचा ही त्या शिक्षकांनी आत्मसवाल करून पहावा, अशी चर्चा रंगू लागली आहे.