ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी न दिल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर तोफ डागली. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’, अशा शब्दात राऊत यांनी ट्विट करून राज्यपालांवर निशाणा साधला.
नऊ एप्रिलला राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला. मात्र, राज्यपालांनी अद्यापही त्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही.