ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमधील अनेक भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील 24 तास अनेक जिल्ह्यात मुसळधार पावस पडण्याची शक्यता वर्तवत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाने सांगितले की, मागील 24 तासात जयपूरमधील जमवारामगडमध्ये सर्वाधिक पाऊस म्हणजेच 250 मिमी पावसाची नोंद झाली.
या व्यतिरिक्त जयपूरमध्ये 180 मिमी, आमेर मध्ये 150 मिमी, टोकंमधील मालपुरामध्ये 100 मिमी, बस्सीमध्ये 130 मिमी, अजमेर मधील पिसांगनमध्ये 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोटा, जोधपुर, पाली, नागौर आणि भरतपुर आदि भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
हवामान विभागाने पुढील 24 तास राज्यातील अजमेर, सिरोही, जालौर, पाली आणि जोधपुर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तर अन्य जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.