ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टल स्केल एवढी होती. यामध्ये प्रकारची हानी झालेली नाही आहे. सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी हा भूकंप झाला. सलग दोन दिवस जाणवलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी काल म्हणजेच 21 जुलै रोजी देखील सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 110 किलोमिटर खोल होते.